गुरुवार, 8 दिसंबर 2011

ताहराबाद ता.राहुरी जि. अहमदनगर येथील संत महिपती यांनी स्थापन केलेले सतराव्या शतकातील विठ्ठल मंदिर. वयोमानामुळे संत महिपती पंढरपुर येथे पायी वारीत जाऊ शकले नाही. तेव्हा त्यांनी विठ्ठलाची विनवणी केली की मला माफ कर मी आता तुला भेटायला येऊ शकत नाही. याच विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी नंतर स्वत: पांडुरंग आपल्या भक्ताला भेटायला येतात अशी आख्यायिका आहे. पाऊलघडी हा कार्यक्रम पाहण्यासाठी मंदिरात हजारोंची गर्दी होते. यावेळी पांडुरंगाची पाऊले कुंकवाच्या रंगात शुभ्र चादरीवर  साकारलेली दिसतात. 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें